मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.
सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीलेमी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.
तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.
आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याचीमी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.
सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्यामी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.
आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठीमी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.
मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारीमी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.
मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावीमी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.
आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापामी चाललो स्वप्न मोडुन, तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी
Saturday, September 27, 2008
मी बरसलो आज शब्दांतुन......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment